सांजवेळेची आठवण
फुलपाखराप्रमाणे दिन उडून जातात अस म्हटलंय कोणी ,
जाणारया प्रत्येक दिवसाबरोबर धूसर होतायेत तुझ्या आठवणी ..
अजूनही मनात ताजी आहे ती मिठी आणि कानामागाचे उष्ण श्वाश ,
अजूनही उरात भरून उरलाय रातराणीचा तो सुवास ....
दिवस निघून जातो , पण सांज मात्र रेंगाळते ..
आठवणीचे प्रत्येक क्षण इंद्रधनू होऊन ओघळते ...
सांजवेळी , तुझ्या आठवणीने शांत होत , दिवसभर भिरभिरणारे मन ..
आणि आठवत नाही , तुला न आठवणारा एकही क्षण ..
सांज वेळ जावून मग रात्रीशी भेट घडते ..
स्वप्नात येते तेच आंगण आणि तू बांधलेले दोघांचे घरटे ..
तुझ्याच आठवणीत रात्रभर जागा राहतो ..
मग पहाटेचा सूर्यच माझ्याकडे हसून पाहतो ..
समोर असतो अंगणात पडलेला मोगऱ्या बरोबरोबाराचा आठवणीचा सडा ...
कुठे तरी दूर कोकिला गात असते ,तूच शिकवलेला प्रेमाचा पाढा ..
आशा करतो नव्या जीवनात सुखी असशील ,
पण मन म्हणत मनातून दुखी असशील ..
आजकाल , दिवस निघून जातो , आणि मग सांज पुढे येते ,
आणि मग तुझ्या आठवणीने मन मात्र वेडे होते...
साद देते , किनाऱ्यावरची सांज वेळ आणि मंद हवा ,
रोजच्या प्रमाणे चालू होतो मग प्रेमाचा अध्याय नवा ..
कधीतरी वेळ जातो मित्रांबरोबर छान,
आता पत्यात हि मिळत नाही बदामाचे पान..
आजकाल , दिवस आणि रात्रीशी बसत नाही मेळ,
प्रेमाच्या गावी घेवून जाते , तुझी आठवण आणि सांज वेळ .....
- प्रवीण