कधीतरी सायंकाळी तुझी आठवण येते
तू जवळ नसल्याची जाणीव ठेवून जाते
भिरभिरत्या मनाला मग संध्याकाळचा साज चढतो ...
तुझ साठी रात्रीलाही जागण्याचा मग नाद जडतो ...
किनार्यावरल्या वाळूत वेड मन चालत राहत
तुझ माझ नाव प्रत्येक लाटेत शोधून पाहत...
क्षितीज्यापलीकडे सूर्यही मग जातो पाठ फिरवून ..
पक्षांचा थवा उडत राहतो मनाला अस्वथ करवून ..
एकट्या मनाची मग मित्रांशी गाठ पडते ..
बोलता बोलता नवीन उमेदेची मग बात घडते ..
झोपी जाताना डोळ्यातला तुझा चेहरा मंद हसत राहतो
माझ्या डोळ्यातले तुझे प्रतिबिंब अलगत वेचून राहतो ..
एखाद्या सायंकाळी तुझ्यामुळे मन व्याकूळ होत
आठवणीचे सारेच क्षण मनात उमलून बकुल होत ..
तुझ्यामुळे आजकाल माझ अस होत
तुझी आठवण येते आणि मन पीस होत ......
-- प्रवीण